Skip to product information
1 of 1

Ganam

Ha Desh Amacha Aahe By Shrimant Mane

Ha Desh Amacha Aahe By Shrimant Mane

Regular price Rs. 300.00
Regular price Rs. 325.00 Sale price Rs. 300.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष स्पष्टपणे जिंकला 

नाही आणि कोणाचा पूर्ण पराभवदेखील झाला नाही. हे नेमके झाले तरी कसे 

आणि मग जिंकले तरी कोण? अर्थातच, भारतीय मतदार जिंकले. 

 

कोट्यवधी मतदारांनी चारशे जागांचे स्वप्न पाहणाऱ्या सत्ताधारी पक्षाला ‘आस्ते कदम`

चा इशारा दिला, तर आधीच्या दोन निवडणुकांमध्ये हतोत्साही झालेल्या विरोधकांना 

मतदारांनी नवी उमेद व उर्जा दिली. या समतोल जनादेशातून मतदार जिंकले हा निष्कर्ष, 

हे अनुमान किंवा विधान भाबडेपणातून केले आहे का? अर्थातच नाही. 

 

खंडप्राय भारतातील या लोकसभा निवडणूक निकालाचा लघुत्तम साधारण विभाज्य

म्हणजे लसावि सांगतो की, मोठा निर्णायक राष्ट्रीय मुद्दा निवडणुकीत नसल्यामुळे 

देशातील 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेश मिळून छत्तीस प्रांतांमध्ये स्थानिक

समीकरणेच प्रभावी ठरली. सोबतच, राज्यघटना बदलण्याची भीती, शेतकरी 

व तरुण मतदारांमधील नाराजी, गरिबी व महागाई अशा जगण्यामरण्याच्या 

मुद्द्यांवर लोकांनी सत्ताधाऱ्याांच्या विरोधात मतदान केले. 

 

या मतदानाचे, निकालाचे हे तर्कशास्त्र, संख्याशास्त्राच्या आधारे विश्‍लेषण 

सांगते की, ही लढाई निवडणूक जिंकण्याचे तंत्र आणि लोक यांच्यात झाली. 

निवडणूक जिंकण्याचे तंत्र बदलले, सुधारले तरी लोकांचे पाय जमिनीवरच आहेत. 

 

लोकशाहीचा उत्सव असे ज्याचे वर्णन केले जाते त्या देशाच्या अठराव्या सार्वत्रिक 

निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या संदेशाचा सार हा की, आम्हाला गृहीत धरू नका. 

हा देश, हे प्रजासत्ताक आमचे आहे. 

- श्रीमंत माने

View full details