Deshamukh and company
Manusmruti Kahi Vichar मनुस्मृती काही विचार By Narhar Kurundkar नरहर कुरुंदकर
Manusmruti Kahi Vichar मनुस्मृती काही विचार By Narhar Kurundkar नरहर कुरुंदकर
Couldn't load pickup availability
मनुस्मृती हा हिंदू धर्मविषयक प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथात चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार केला असून, पुरुष केंद्रित असल्याने तो वादग्रस्तही आहे. ज्येष्ठ लेखक, संशोधक नरहर कुरुंदकर यांनी या ग्रंथाचा ऊहापोह त्यांच्या भाषणांमधून केला आहे.
ही तीन भाषणे पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आली आहेत. १९२७ मध्ये या ग्रंथाचे विधीपूर्वक दहन झाले. याबद्दलचा आनंद त्यांनी प्रथम व्यक्त केला आहे. मनूच्या प्रामाण्याचा लोककल्याणाच्या भूमिकेवरून पहिला विरोध लोकहितवादींनी केला आहे, असे ते सांगतात.
यानंतरच्या काळात मनुस्मृतीला कसा विरोध होत गेला, याचा मागोवा ते घेतात. मनुस्मृतीला आधार जेथे घेतला आहे, त्याचाही ते धांडोळा घेतात. काही श्लोकांच्या आधारे त्यांनी त्याचा अर्थ उलगडला आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.